शुक्रवार, ९ जून, २०२३

राज्यात आठ नवीन फळपिकांना मिळणार विमा संरक्षण. असा होणार शेतकऱ्यांना फायदा.

 राज्यात आठ नवीन फळपिकांना  मिळणार विमा संरक्षण.  असा होणार शेतकऱ्यांना फायदा. 



 राज्याने आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे. याप्रमाणे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.  यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, सिताफळ, आणि द्राक्ष या आठ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार आणि उत्पादनक्षम फळबागांनाच लागू राहणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांनी दिलेली आहे.

या योजनेअंतर्गत कमी पाऊस ,जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आद्रता, किमान तापमान या हवामान पासून होणारे धोक्यांपासून या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे.

या योजनेत कोण सहभी होऊ शकतात:-

ही योजना फळपिकांसाठी असून ऐच्छिक स्वरूपाची आहे योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र हे ज्या बँकेमध्ये पीक कर्ज खाते किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे पुणे 

पिक विमा साठी लागणारे कागदपत्रे:-

बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळ पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग नोंदवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, 8अ उतारा, पिक लागवड घोषणापत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुक व, बँक खाते याबाबतची सविस्तर माहिती कॉमन सर्विस सेंटर मार्फत ऑनलाईन अर्ज करून भरता येईल.

अधिसूचित फळपीकांपैकी फक्त एकाच फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबे बहार पैकी कोणत्याही एका हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.


अनु.क्र

पीक / फळ 

विमा रक्कम

विमा हप्ता

अंतिम दिनांक

डाळिंब १,३०,०००/-६,५००/-१४ जुलै 
मोसंबी ८०,०००/-४,०००/-३० जून 
चिकू ६०,०००/-१३,२००/-३० जून 
संत्री,
लिंबु 
७०,०००/-
८०,०००/-
४,५००/-
६,०००/-
१४ जून 
१४ जून 
द्राक्ष ३,२०,०००/-१६,०००/-१४ जून 
सीताफळ ५५,०००/-६,३२५/-३१ जुलै 
(वरील तक्ता फक्त पुणे जिल्ह्याकरिता. कृपया आपल्या जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे चौकशी  करावी.) 

वन विभागात विविध पदांसाठी मेगा भरती . एकूण पदे २४१७. अंतिम दिनांक ३० जून येथे करा अर्ज

वन विभागात विविध पदांसाठी  मेगा भरती . एकूण पदे २४१७. अंतिम दिनांक ३० जून येथे करा अर्ज 


महाराष्ट्र शासनातर्फे प्रधानवन संरक्षक (वन बलप्रमुख) महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सरळ सेवा भरती 2023 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये वनविभागातील 

०१) लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित

०२) लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित

०३) कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित

०४) वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क

०५) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क 

०६) लेखापाल गट क 

०७) सर्वेक्षक गट क 

०८) वनरक्षक गट क 


एकूण पदे 2417 इतकी आहेत. सविस्तर पदाच्या जाहिरातीकरिता येथे क्लिक करा.


जाहिरातीत नमूद पदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया Recruitment या टॅब मध्ये उपलब्ध लिंक वर अर्ज मागण्यात येत आहेत

पदांचा तपशील खालील प्रमाणे

अ.क्र.

पदनाम

जाहिरात क्रमांक 

पदांचा स्तर

भरती करिता एकूण उपलब्ध


लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित

कक्ष-७/१

राज्यस्तरीय पद १३

लघुलेखक निम्न श्रेणी गटब अराजपत्रित

कक्ष-७/१राज्यस्तरीय पद २३

कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित

कक्ष-७/१राज्यस्तरीय पद 

रिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क कक्ष-७/१राज्यस्तरीय पद 

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट क कक्ष-७/१राज्यस्तरीय पद १५

लेखापाल गट क कक्ष-१०/१राज्यस्तरीय पद १२९

सर्वेक्षक गट क कक्ष-१०/२राज्यस्तरीय पद ८६

वनरक्षक गट क कक्ष-१०/३राज्यस्तरीय पद २१३८



ऑनलाईन  अर्ज भरण्याची सुरुवात ऑनलाईन   अर्ज भरण्याची अंतिम मुदत 
दिनांक- १०/०६/२०२३दिनांक-३०/०६/२०२३

सविस्तर जाहिरात www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया या टॅब मध्ये उपलब्ध आहे.

बुधवार, ७ जून, २०२३

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा. Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.  पीएम किसान योजना. या दिवशी होणार पहिला हफ्ता जमा.   Namo Shetkari Mahasnman Nidhi Yojana. PM Kisan Yojana 



Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana:- महाराष्ट्रात अनेक लोकांचे उत्पन्न कृषी आणि संबंधित सेवांवर अवलंबून आहे.परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून  शेतीचे उत्पादन  अनेक घटकांवर अवलंबित असून त्यात नेहमी  चढ-उतार होत असते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM Kisan Sanman Nidhi Yojana सुरू केली असून ज्यामध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६,०००/- रुपये दिले जातात. 

 शेतकऱ्यांना अधिक मदत करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने  पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना २०२३ सुरू केली आहे. 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत देणे आणि त्यांचे उत्पन्न सुरक्षित करणे हा आहे.

 या योजनेला "महाराष्ट्र शेतकरी आर्थिक सहाय्य योजना" किंवा "महाराष्ट्र शेतकरी सन्मान निधी योजना" किंवा "महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान योजना" असेही म्हणतात.

 महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६,०००/-.रुपये दिले जातील.  हि रक्कम पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्याजाणार्या ६,०००/- या रकमेव्यतिरिक्त असतील. अश्याप्रकारे महाराष्रात्रातील शेतकऱ्यांना १२,०००/- प्रतिवर्षी मिळतील 

कोण असतील पात्र. 

 पीएम किसान योजनेचा लाभ घेणारा प्रत्येक शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यास आपोआप पात्र ठरतो.

कसा मिळेल लाभ?

 शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये ६,०००/- रुपये.

कुठे आणि कसा कराल अर्ज?

 नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी कोणताही वेगळा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरला जात नाही.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आपोआप पात्र ठरतात.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय  लागेल?

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना गावच्या तलाठी कार्यालयाकडे आधार कार्ड ची आणि पासबुक ची  झेरॉक्स द्यावी लागली होती. त्यातून त्यांची नावे नोंदणी झाली होती . आता देखील तशीच कागदपत्रे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जमा करावी लागतील . 

या नागरिकांना लाभ मिळण्याची शक्यता कमी ?

 राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर हा निर्णय घेतला असल्याने  या योजनेचे निकष नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेलाही लागू असतील. पीएम किसान योजना हि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी असून यामध्ये घटनात्मक पदे जसे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश, आजी-माजी लोकप्रतिनिधी शासकीय कर्मचारी करदाते, डॉक्टर इंजिनयर वकील सनदी लेखापाल वास्तुरचनाकार इत्यादींना वगळण्यात आले आहे. 

सोमवार, २९ मे, २०२३

 

All image credit-Internet

महाराष्ट्र  शासनाच्या पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन ४४६ जागांसाठी भरती जाहीर २०२३.


 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन विविध ४४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून भरतीची जाहिरात पशु संवर्धन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात अली आहे. 

    शासन निर्णय , वित्त विभाग पदनि -२०२२/प्र. क. २/२०२२/आपुक ,दि ३१/१०/२०२२ अन्वये वित्त विभागाने पदभरती वरील निर्बंध शिथिल केले आहेत. या नुसार पदभरतीला मान्यता देताना  विभाग/कार्यालयाचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अश्या विभागातील (वाहन चालक व गट ड  संवर्गातील पदे वगळून) सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे.

 
    पशुसंवर्धन विभाकडे राज्यस्तरीय गट -  क सरळसेवा संवर्गातील विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या संवर्ग निहाय रिक्त पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करावे. येथे क्लिक

-:अर्जाचे वेळापत्रक :-

 १

 ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात 

 दिनांक २७.०५. २०२३ (सकाळी १०.००पासून)

 २

 ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 

 दिनांक ११.०६. २०२३ (रात्री ११.५९ पर्यंत )

 ३

 ऑनलाईन परीक्षेचा दिनांक 

 कृपया येथे क्लिक करा. 


सविस्तर जाहिरात बघण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. 

-:पदनिहाय रिक्त पदांची संख्या खालील प्रमाणे :-

 अ . क्र 

 पदाचे नाव 

 रिक्त पदांची संख्या 

 १

पशुधन पर्यवेक्षक  

 ३७६

 २

 वरिष्ठ लिपिक 

 ४४

 ३

 लघुलेखक (उच्च श्रेणी)

 २

 ४

 लघुलेखक (निन्म श्रेणी)

 १३

 ५

 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

 ४

 ६

 तारतंत्री -३,यांत्रिकी -२, बाष्पक परिचर -२

 ७


:-परीक्षा शुक:-
अमागास :-रुपये १०००/-
मागासवर्गीय / आ. दु. घ /अनाथ/ दिव्यांग/ माजीसैनिक:- रुपये ९००/- (१०% सवलत)
बँक चार्जेस वेगळे देय असतील.  तसेच परीक्षा शुल्क ना परतावा आहे. 


कृपया अधिक माहितीसाठी श्री. विकास सोनावणे मो. क्र.  (साठी येथे क्लिक करा ) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन  विभागातर्फे करण्यात आले आहे. 

रविवार, २८ मे, २०२३

दिड लाखाच्यावर नौकरभरती ...... 



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे प्रगती मैदान येथील नवीन संमेलन सभागृहात नीती आयोगाची आठवी नियामक परिषद संपन्न झाली.  या परिषदेमध्ये विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांनी हजेरी लावली होती. या परिषदेला केंद्रीय मंत्री , आयोगाचे उपाध्यक्षासह सदस्य हि उपस्थित होते. 

विकसित भारत @ २०४७ -

    विकसित  भारत @२०४७ हि संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट वचनबद्ध असल्याचे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी येथे परिषदेला नमूद केले. महाराष्ट्राने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय ध्येयाशी जोडले असून महिला सक्षमीकरण, शेतकारी, तसेच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी महराष्ट्र शासन वचनबद्ध असल्याचेही प्रतिपादन श्री शिंदे यांनी केले. 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना -

    शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' सुरु केल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. यात अतिरिक्त निधी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि यातून १. १५ कोटी शेतकरी कुटुंबाना फायदा होणार आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्यासाठी राज्य विम्याचा हफ्ता भारत असून 'महाराष्ट्र राज्य कृषी माल निर्यात धोरण '  जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहें. 

दिड लाखाच्यावर नौकरभारती-

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्यात २०२३ डिसेंबर अखेर पर्यंत दिड लाखांहून अधिक शासकीय नौकर भरती केली जाईल असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली. 

धन्यवाद 

गुरुवार, २५ मे, २०२३

मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.

🌹श्री स्वामी समर्थ 🌹 

 मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांना मराठी विश्वकोश खंडाची प्रत भेट म्हणून देतांना. 


वाई : मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोश मूलभूत कार्य करत असून ते सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मा. राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. वाई येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मराठी विश्वकोश कार्यालयास मा. राज्यपाल रमेश बैस यांनी  आज सदिच्छा भेट दिली, यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस उप अधिक्षक शीतल जानवे-खराडे, प्रभारी तहसीलदार वैशाली जायगुडे आदी प्रमुख उपस्थित होते.

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांचे स्वागत करतांना . 



नवीन शैक्षणिक धोरणात व्यावसायिक आणि उच्च शिक्षण मातृभाषेतून द्यायचे आहे. यासंदर्भात मराठी विश्वकोशाने यापूर्वीच विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयावर केलेले नोंदलेखनाचे कार्य मार्गदर्शक असल्याचे मत मा. राज्यपालांनी व्यक्त केले तसेच विश्वकोश मंडळ करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 


हे हि वाचा - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहेडाउनलोड कसे करायचे ते पहा

सुरुवातीस मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी विश्वकोश खंड भेट देऊन मा. राज्यपाल यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. शामकांत देवरे यांनी मराठी विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया सांगून विश्वकोशाच्या सर्व माध्यमांची आणि भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली. 

मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ शामकांत देवरे मा राज्यपाल श्री रमेश बैस यांना मराठी विश्वकोशाची  माहिती देतांना 

हे हि वाचा -आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी.. 

मा. राज्यपाल यांनी विश्वकोश ग्रंथालयास भेट दिली तसेच सर्व संपादकांशी हितगुज करत कामकाज जाणून घेतले. यावेळी विद्याव्यासंगी संपादक डॉ. जगतानंद भटकर, डॉ. स्नेहा खोब्रागडे, आनंद गेडाम, सरोजकुमार मिठारी, प्रीती साळुंके, संतोष गेडाम, रवींद्र घोडराज, पल्लवी गायकवाड, शिल्पा भारस्कर, वर्षा देवरुखकर, लिपिक सचिन भाडळकर, वर्षा नाईक आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.




आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी..

🌹श्री स्वामी समर्थ 🌹 

आज बारावीचा निकाल जाहीर. जाणून घ्या कोणी मारली राज्यात बाजी.. 


१२ वी चा निकाल जाहीर 


आज महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी दिलेल्या उच्च शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र्र राज्यातील सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. राज्यात ९ विभागात कोकण विभागाने ९६. ०१ % विध्यार्थी उत्तीर्ण होऊन पहिला विभाग येण्याचा मान मिळवला आहे. 

हे हि वाचा -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे.  डाउनलोड कसे करायचे ते पहा

इतर विभागांची टक्केवारी खालील प्रमाणे आहे

                    कोल्हापूर-९३.२८%

                    अमरावती-९२.७५%

                    नागपूर-९०. ३५%

                    मुंबई-८८. १३%

                    कोंकण-९६. ०१%

                    पुणे-९३. ३४%

                    लातूर-९०. ३७%

                    नाशिक-९१. ६६%

                    औरंगाबाद -९१. ८५%

हे हि वाचा -शैक्षणिक  वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET 2023-24) देणाऱ्यांसाठी थोडे महत्वाचे.. वाचले नाहीतर होऊ शकते  खूप मोठे नुकसान


राज्यात एकूण १४,१६,३७१ विद्यार्थी इयत्ता १२ वी च्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी  १२,९२,४६८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले असून एकूण टक्केवारी ९१. २५% आहे. राज्यात पास झालेल्या  एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलींनी ९३. ७३% मुलींनी यश मिळवत बाजी मारली तर मुलांचे प्रमाण ८९. १४% इतके आहे

हे हि वाचा - मराठी भाषा संवर्धन आणि विकासात मराठी विश्वकोशाचे मूलभूत कार्य – मा. राज्यपाल रमेश बैस.

१२ वी च्या (HSC) निकालाबाबत मोठी घोषणा . असा चेक कराल निकाल ..

   🌹श्री स्वामी समर्थ 🌹


१२ वी च्या निकालाबाबत मोठी घोषणा . असा चेक कराल निकाल दुपारी २ वाजता.

     महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Result 2023) निकालांकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. 12 वीचे निकाल आज , गुरुवारी (25 मे) जाहीर करण्यात येत आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिची अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही शरद गोसावी यांनी सांगितले. 

साधारण फेब्रुवारी २०२३ अखेरपासूनच बारावी आणि मार्च २०२३ पासून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. ज्यानंतर आता काही दिवसांची सुट्टीही शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे आपल्या शैक्षणिक महत्त्वपूर्ण टप्प्याच्या या निकालांकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मे २०२३ महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारावी, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुनर्मुल्यांकन आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होईल.

हे देखील वाचा:-मुंबईमध्ये घर घ्यायचंय... तेही  स्वस्तात ......  मग हि बातमी तुमच्यासाठीच .... 

कुठे आणि कसा निकाल उपलब्ध असेल ?

    विद्यार्थ्यांना सदर निकाल बोर्डाची अधिकृत संकेतस्थळ १) https://www.mahahsscboard.in तसेच २) mahresult.nic.in आणि ३) mahresults.org.in वर पाहाता  येईल.
विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर पुढे बारावी (HSC) पर्याय निवडावा. पुढे हॉलतिकीट क्रमांक आणि इतर माहितीचा तपशील भरल्या नंतर काही क्षणांतच निकाल तुमच्यासमोर येईल. राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी आणि पालक या संकेतस्थळावर एकाच वेळी भेट देणार असल्यामुळे काहींना निकाल पाहताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं तांत्रिक अडथळे उदभवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन परीक्षा मंडळाकडून देण्यात आलं आहे. एसएमएस (SMS) आणि डिजिलॉकरद्वारे (DigiLocker) देखील विद्यार्थ्यांना निकाल पाहाता येणार आहे.

या महत्वाचे संकेतस्थळं ..

www.mahresult.nic.in साठी येथे क्लिक करा 
www.hscresult.mkcl.org साठी येथे क्लिक करा 
www.mahahhscboard.in साठी येथे क्लिक करा 


ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (HOW TO CHECK ONLINE 12 RESULTS?)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.
निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला भेट द्या .
होम पेजवर जा आणि  महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.
तुमचा बैठक क्रमांक , शाळेचा सांकेतांक  आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


कसा चेक कराल तुमचा  निकाल? (How to check Maharashtra HSC results 2023 marksheets)

स्टेप 1 - महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला बैठक क्रमांक  टाका.
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

SMS Text Msg द्वारे निकाल कसा पाहाल..? (HOW TO CHECK VIA SMS)
स्टेप 1. तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अँपवर जा.
स्टेप 2. तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.
स्टेप 3. 57766 वर मेसेज सेंड करा.
स्टेप 4. तुमचा निकाल तुम्हाला Text SMS द्वारे प्राप्त होईल.

डिजिलॉकरद्वारे कसा पाहाल निकाल? (HOW TO CHECK VIA DIGILOCKER)

स्टेप 1. DigiLocker अँप उघडा किंवा digilocker.gov.in वर लॉग इन करा.
स्टेप 2. आवश्यक तपशील सबमिट करून नवीन नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणी केली असल्यास तुमच्या खात्यात लॉग इन करा.
स्टेप 3. 'MSBSHSE SSC निकाल 2023' वर क्लिक करा.
स्टेप 4. महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल मिळविण्यासाठी तुमच्या आधार कार्डवरील डिटेल्स द्या.
स्टेप 5. निकाल तुम्हाला प्राप्त होईल.

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा . 👍